अन्न, वस्त्र, आणि निवारा ह्या मानवाच्या मुख्य गरजा असल्या तरी आज त्यात अनेक इतर<br />गोष्टींनी सुद्धा प्रवेश केला आहे. ह्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांने अनेक प्रश्नांची<br />उत्तरे दिली. ते म्हणाले कि आमची प्राथमिकता कृषी आणि रस्ते बांधणी ला आहे. शेतकऱ्यांच्या<br />कर्जमाफीनंतर अनेक बदल दिसू लागतील. जलयुक्त शिवार योजने मुळे महाराष्ट्रात मुबलक<br />पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय ट्रान्सहार्बर रस्त्याचा 22 कि. मी. चा भाग समुद्राच्या गर्भातून<br />जाईल. ट्रान्सहार्बर आणि कोस्टल रोड ह्या योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून हीरवा<br />कंदील मिळाला आहे. येत्या काही महीन्यात ह्या दोन्ही परीयोजनांचे भूमिपूजन होईल. कोस्टल<br />मार्गाचा एक हीस्सा बी.एम.सी. तर दुसरा हीस्सा राज्य सरकार पूर्ण करणार आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews